धन्नाशेटचा मुलगा राम हा खूपच आळशी होता . घरांत गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा असल्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता . शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.
दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, “हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल”.
मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. रामने तो रुपया शेठजींच्या हातावर ठेवला तर शेठ्जीनी तो विहीरीत फेकून दिला.
दुसर्या दिवशी, आईकडून त्याला एक रुपया मिळाला . त्याने तो शेठजींच्या हातावर ठेवला तर शेठ्जीनी पुन्हा तो विहिरीत फेकून दिला .
तिसर्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले.
स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. ‘साहेब, इकडे आणा’. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. ‘बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?’
शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, ‘बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली.
दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.’
तात्पर्य :- स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई .
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- संत गाडगे महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
- संत कालिदासांचे 6 सुप्रसिद्ध सुविचार
- महात्मा ज्योतिबा फुले यांचे सुविचार
- रवींद्रनाथ टागोर यांचे अनमोल विचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार
- गोस्वामी संत तुलसीदासांचे विचार